kavita - shailaja shewade

Friday, June 22, 2007

रे खुळ्या या आसवांनो,

रे खुळ्या या आसवांनो,
बांध का हा पार केला,
ज्या कुणी हा वार केला,
तो कधीचा दूर गेला।
दो घडीची साथ त्याची,
दो घडीच्या सोबत्याची,
रात्रीपुरता टेकलेला,
लावून हुरहुर गेला।
रे सुरांच्या अक्षरांनो,
का उगा झंकारता,
ज्यामुळे हा रंग आला,
तोच वादी सूर गेला।
रे मनाच्या पाखरांनो,
खंतावता का शोधतांना,
लाट अशी झेपावली अन,
मिटवून गेली त्या खुणांना।

0 Comments:

Post a Comment

<< Home